Lok sabha Election result LIVE : निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच एनडीए आघाडीवर… पहा लाईव्ह निकाल
आज दिनांक 4 जून 2024 म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा निकाल. निवडणुकीचा निकाल आज लागणार असून सध्या निवडणुकीची मतमोजणी ही चालू आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणी नुसार असे लक्षात येत आहे की NDA आघाडीवर असून, परत एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत NDA सरकारला जे भारि बहुमत पडले होते त्या तुलनेत या निवडणुकीत बहुमत आणि त्यांचे सिटी कमी येण्याची शक्यता आहे. INDAI गटबंधन जोरदार कामगिरी केली असून या निवडणुकीत त्यांना मागच्या निवडणुकीपेक्षा जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे. Lok sabha Election result LIVE
आतापर्यंत जाहीर झालेल्या NDA 290 सीटांवर आहे तर INDAI 230 सीटावर आहे. तर इतर 23 जागा आहे. येत असलेल्या निकालानुसार आता सध्या तरी NDA तेच सरकार बनणार आहे. असे तरी म्हणायला हरकत नाही. परंतु सर्वच निकाल जाहीर होईपर्यंत काहीही घडू शकते. जी जागा सध्या आघाडीवर चालू आहे ती जागा पिछाडीवर योद्धा येऊ शकते.
साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत निवडणुकीचा संपूर्ण निकाल जाहीर केला जाणार आहे. जर NDA सरकार आले तर हा एक इतिहास घडला जाईल. सलग तिसऱ्यांदा NDA सरकार येणार आहे. आणि सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहणार आहे. कारण NDA गटबंधन यांनी आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी यांनाच ठेवले आहे. Lok sabha Election result LIVE
Lok sabha Election result LIVE महाराष्ट्राचा निकाल
महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उलाढाली बघायला भेटत आहेत. महाराष्ट्रातला विचार केला तर महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी भाजपा आता सध्या 13 जागा आघाडीवर लढत आहे, शिंदे 8 जागांवर लढत आहे, अजित पवार गट हा 1 जागेवर लढत आहे, ठाकरे गट हा 8 जाग्यांवर लढत आहे, शरद पवार गट सुद्धा 8 जागेवर लढत आहे, काँग्रेस 9 जागेवर लढत आहे. तर 1 अपक्ष उमेदवार आहे. Lok sabha Election result LIVE
लवकरच निवडणुकीचा निकाल समोर येणार असून, देशाचे भवितव्य ठरणार आहे. देशाला एक प्रामाणिक नेता मिळावा हेच सर्वसामान्यांचे ध्येय आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी जातीपातीचे राजकारण केले असून, यामुळे सत्ताधारी पक्षांना मोठा फायदा झाल्याचे सध्या तरी दिसत आहे. Lok sabha Election result LIVE
हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, आतंकवाद, राम मंदिर अशा कितीतरी गोष्टींवर सत्ताधारी पक्षांनी प्रचारामध्ये वोटिंग मागितली आहे. आणि सर्वसामान्य जनतेला 5 किलो धान्य फ्री मध्ये दिल्या जाईल. असेही निवडणुकीआधी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता ही सरकारच्या भूलथापांना बळी पडून सत्ताधारी पक्षांच्या पाठीमागे गेली आहे असे तरी सध्या दिसत आहे.
स्वातंत्र्य मिळवून एवढ्या वर्षानंतरही जर सरकारला देशातील नागरिकांना अन्य धान्य पूर्ण पुरवण्याची गरज वाटत असेल तर या देशाचा काय विकास झाला आहे हे आपणच बघू शकतात. ज्या देशात नागरिक स्वावलंबी असेल त्या देशाचा खरा अर्थाने विकास झाल्याचे म्हटले जाईल. परंतु आपल्या देशात आजही पाच किलो धान्य फुकट दिले जाईल या आशेवर जर जनता एखाद्या उमेदवाराला निवडून देत असेल तर ही खरंच मोठी शोकांतिका आहे. Lok sabha Election result LIVE